प्रत्येक
नागरिकाने मतदार नोंदणी करणे आवश्यक
-
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली,दि.24: लोकशाही बळकट
होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असून त्यासाठी मतदार यादीत नावनोंदणी
करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी केले.
येथील
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत ‘राष्ट्रीय मतदार
दिवस’ निमित्त् आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश
मिणियार, उप जिल्हा निवडणुक अधिकारी राजु नंदकर, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे,
प्राचार्य डॉ. आर. के. सावंत, तहसिलदार श्री. खंडागळे, पोलीस निरिक्षक श्रीमनवार आणि
श्री. सुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय निवडणूक
आयोगाबाबत मार्गदर्शन करतांना अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिणियार म्हणाले की, 25 जानेवारी,
1950 निवडणूक आयोगाची स्थापना झाली असून भारतीय
निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय
संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकीविषयक सर्व कामकाज निवडणूक
आयोग करते. तीन सदस्यी निवडणूक आयोगाची रचना आहे. मतदार याद्या तयार करणे, मतदारांची
पडताळणी करणे, मतदार ओळख पत्र देणे, अचारसंहिता लागू करणे, नामाकंन, नामाकंनाची छाननी,
मतदान घेणे, मतमोजणी करणे, निवणुक निकाल जाहिर करणे ही महत्वाची कार्य निवडणूक आयोगामार्फत करण्यात येतात.
तर भारतीय संविधानाच्या
73 व 74 दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात
आली. नागरी भागातील
स्थानिक स्वराज्य संस्था महानगर पालिका, नगर परिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याची
संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. संविधानातील तरतुदीनुसार
‘निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि
अशा निवडणुकांचे आयोजन’ याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असल्याची माहिती दिली.
तसेच 18 ते
20 वयोगटातील युवकांनी आपली मतदार नोंदणी करण्याची आवाहन करत Voter Helpline या मोबाईल
ॲपद्वारे देखील मतदार नोंदणी करता येते अशी माहिती श्री. मिणियार यांनी यावेळी दिली.
उपजिल्हा
निवडणूक अधिकारी राजू नंदकर प्रास्ताविकात म्हणाले की, 25 जानेवारी 1950 रोजी आयोगाची
स्थापना झाल्याने सन 2011 पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन साजरा केला जातो.
नुकत्याच लोकसभा आणि विधानसभा निवडणूका शांततापूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या. तसेच सद्या आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या
मतदार पडताळणी कार्यक्रमात आपला जिल्हा राज्यात प्रथम आहे.
यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत उल्लेखनीय कार्य केलेले बीएलओ यु. एन. तोरकड,
प्रताप दशरथे, एस. डी. भस्के, एस. पी. बनसोडे, एस. बी. टेहरे, एस. जी. माहोरे, वाय.
सी. पारसकर, व्ही. यु. हलगे, एस. एन. नाईक, एस.टी. रामदिनेवार, एस. एस. रामोड, आर.
एच. वाठोरे, जी. बी. पायघन, ए. वाय. बिल्लारी, जी. आर. क्षिरसागर आणि गजानन नायकवाल
यांचा यावेळी प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय मतदार
दिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार आयोजित करण्यात
आलेल्या रांगोळी स्पर्धेत कु.गायत्री वाकडे, कु. कांचन वाकडे यांचा प्रमाणपत्र देवून
सत्कार करण्यात आला. तसेच नवमतदारांना यावेळी प्रातिनीधीक स्वरुपात मतदार ओळखपत्राचे
वितरण करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी मतदानाची प्रतिज्ञा
दिली.
यावेळी कार्यक्रमात
शाहीर श्री. दांडेकर यांनी सादर केलेल्या मतदार जनजागृतीपर गीतांनी कार्यक्रमात बहार
आणली.
कार्यक्रमास
यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, बीएलओ, प्राध्यापक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश येवले यांनी केले तर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे
यांनी आभार मानले.
****
No comments:
Post a Comment