25 January, 2020



युवक आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करा
--   पालकमंत्री वर्षा गायकवाड

हिंगोली,दि.25:  जिल्ह्यातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरीता बँकांनी त्यांच्यासाठी उद्योगाशी संबंधीत कर्जयोजना सुरु करुन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करावे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्या .
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, युवाशक्ती हीच आपल्या देशाची खरी संपत्ती आहे असून त्यांनी उद्योग उभा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. परंतु त्यासाठी नौकरीबाबतची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज  उद्योगाची अनेक दालने खुली असून जिल्ह्यातील युवक आणि महिलांनी उद्योग सुरु करून विविध क्षेत्रात आपल्या जिल्ह्यात उद्योग संस्कृती निर्माण करावी. कोणताही उद्योग सुरु करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. याकरीता बँकांनी उद्योग विषयक कर्ज योजना सुरु करुन जिल्ह्यातील युवक आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

*****

No comments: