26 January, 2020



पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला ‘संविधान उद्देशिका’ वाचन उपक्रमांचा शुभारंभ

हिंगोली, दि.26: विद्यार्थ्यांवर शालेय जीवनापासूनच समता, स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुता हे पंचसुत्री संविधानिक संस्कार करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाचे सामूहिक वाचन उपक्रमाची अंमलबजावणी प्रजाकसत्ताक दिनापासून सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 
त्यानुसार आज येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाळेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थीनी, शालेय शिक्षकवृंद आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ‘संविधान उद्देशिका’ वाचन करुन या उपक्रमांचा शुभारंभ केला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खा. राजीव सातव, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड आदींची उपस्थिती होती.

****



No comments: