26 January, 2020



पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ

हिंगोली, दि.26 : राज्य शासनाने गरीब व गरजू व्यक्तिंसाठी केवळ 10 रुपयांमध्ये सकस आहार देण्यात करीता  ‘शिवभोजन’ योजनेची घोषणा केली होती. या ‘शिवभोजन’ योजनेची पहिल्या टप्प्यात अंमलबजावणी प्रजाकसत्ताक दिनापासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
त्याअनुषंगाने पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते येथील जिल्हा रुग्णालय परिसरात ‘शिवभोजन’ केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शिवभोजन थाळी वितरीत करण्यात आली. पुढील टप्प्यात जिल्ह्यात शिवभोजन केंद्राची सुरुवात करण्यात येणार असून, या योजनेमुळे गरीब व गरजू रुग्णांच्या नातेवाईकांची सोय होणार असल्याचे यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
यावेळी माजी. खा. राजीव सातव, माजी. आ. डॉ. सतीश टारफे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
****



No comments: