29 July, 2021

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी

12 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील, अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्याकडून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून उपलब्ध निधीच्या अधीन राहून जेष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास  निधीच्या उलब्धतेनुसार शिष्यवृत्ती मंजूर करुन वितरण करण्यात येणार आहे.

यासाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनीनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश  घेतल्याची पावती, बोनाफाईड सर्टीफिकेट व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रांसह दि. 12 ऑगस्ट, 2021 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) हिंगोली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली फोन नं.02456-223831 येथे संपर्क साधावा. तसेच उशीरा आलेल्या अर्जाचा मुख्यालयामार्फत विचार करण्यात येणार नाही, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

No comments: