03 January, 2025
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत 6 ते 20 जानेवारीपर्यंत गतिमानता पंधरवडा घोषित
• मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची जास्तीत जास्त सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 03 : विकास आयुक्त (उद्योग) यांनी दि. 6 ते 20 जानेवारी, 2025 पर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत गतिमानता पंधरवडा घोषित केला आहे. हा पंधरवडा यशस्वी होण्यासाठी विकास आयुक्त उद्योग दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वाखाली उद्योग संचालनालय आणि खादी व ग्रामोद्योग विभागाच्या अधिनस्त सर्व जिल्हा उद्योग केंद्र तसेच जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयातील आधिकारी, कर्मचा-यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचेच काम करावयाचे आहे.
सर्व महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालयात तसेच शासकीय व खाजगी आयटीआय, अशासकीय संस्था येथे योजनेचे जनजागृती मेळावे, प्रचार व प्रसिद्धी आयोजित करून पात्र लाभार्थ्यांचे जागेवर अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करावी व अर्ज तात्काळ पोर्टलवर अपलोड करावेत.
एमसीईडी, मिटकॉन, आरसेटी, कौशल्य विकास येथील प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडून तरुण-तरुणींची यादी घेऊन त्यांना योजनेची माहिती द्यावी. महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, महिला बचत गटांशी संपर्क साधून त्यांना प्राधान्याने योजनेत सहभागी होण्यासाठी कृती आराखडा तयार करून महिला मेळावे घ्यावेत.
जिल्ह्यातील सर्व महामंडळे आणि स्वयंसेवी संस्थांना (NGO) संपर्क साधून लाभार्थी योजनेत सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एक बँक एक प्रकरण यासाठी सर्व बँक व्यवस्थापकांना संपर्क करून योजनेत सहभाग वाढविणे. एक गाव किमान एक प्रकरण याप्रमाणे काम करणे. एक जिल्हा एक वस्तू याप्रमाणे जिल्ह्यातील उद्योगांना प्राधान्य देणे. औद्योगिक समूह योजनेतील लाभार्थींना लाभ देणे. मासिक, त्रैमासिक बँकेच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठका आयोजित करणे व विस्तृत पाठपुरावा, समन्वय करणे. बँकेत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करून घेणे.
वरील सूचनांचे पालन करून सर्व जिल्ह्यांमध्ये बँकाकडे प्रलंबित प्रकरणाबरोबर लक्ष्यांकाच्या दोन ते अडीच पट प्रकरणे बँकांना पुढील पंधरा दिवसात पाठविण्याची कार्यवाही पूर्ण करणे. जानेवारी 2025 अखेरपर्यंत 50 टक्के मंजुरीचे उदि्दष्ट व 25 टक्के क्लेम सादर करण्याची कार्यवाही पूर्ण करणे निश्चित केलेली आहे.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन यांचे कर्मचारी व अधिकारी हे अभियान राबविणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व युवक-युवतींना या पंधरवाड्याच्या निमित्ताने जास्तीत-जास्त प्रकरणे Maha-cmegp.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अपलोड करावीत किंवा जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन यांच्याकडे नवीन प्रशासकीय इमारत, हॉल नं एस-12, हिंगोली येथे संपर्क साधावा, ज्यांचे प्रस्ताव बँक शाखेकडे प्रलंबित आहेत त्यांनी बँक शाखेकडे संपर्क साधून आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment