26 August, 2021

 

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी

शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत सन 2021 मध्ये इयत्ता दहावी, बारावी व पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण प्राप्त करुन पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यांसाठी  सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. पात्र माजी सैनिक , विधवांच्या पाल्यांनी  दि. 15 ऑक्टोबर, 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली  येथे कागदपत्रासह अर्ज सादर करावेत.

अर्जासोबत इयत्ता दहावी, बारावी व पदवी गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असलेल्या इयत्तेचे बोनाफाईड सर्टीफिकेट, केंद्र/राज्य शासनाची/ इतर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा, महाविद्यालयाचा, संस्थेच्या प्राचार्याचा दाखला, ज्या पाल्यांनी सीईटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे अशा पाल्यांना प्रकरणासोबत गॅप सर्टीफिकेट (स्वयंघोषणापत्र) , माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत, मुलीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असल्यास मुलगी अविवाहित असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, आर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डच्या दोन्ही बाजूची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबूकच्या पहिल्या पानाची व आधार कार्डाची छायांकित प्रत जोडण्यात यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी केले आहे. 

*****

No comments: