26 August, 2021

 

कृषि विज्ञान केंद्रामध्ये किसानों के लिए खाद्य एवं पोषण कार्यक्रम संपन्न

विविध मान्यवरांचे मार्गदर्शन


 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि कृषी मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने  किसानों के लिए खाद्य एवं पोषण या विषयावर आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारंगा येथील प्रगतीशील शेतकरी आबासाहेब कदम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी रत्न पुरस्कार प्राप्त गोरखनाथ हाडोळे हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके हे होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोरखनाथ हाडोळे यांनी सेंद्रीय शाळू ज्वारी व भाजीपाल्याची  शेती याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब कदम यांनी सेंद्रीय शेती व सकस आहार याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रा. राजेश भालेराव यांनी मातीचे आरोग्य या विषयावर माहिती दिली. प्रा. अजयकुमार सुगावे यांनी रोगप्रतीकारक क्षमता कशी वाढवावी तसेच पिक संरक्षणासाठी सप्तसुत्री सांगितली. डॉ. कैलास गिते यांनी गाईच्या दुधाचे आहारातील महत्व याविषयी माहिती दिली. तोंडापूर येथील महिला शेतकरी वंदना थोरात यांनी स्वत:च्या शेतामधील सेंद्रीय शेतीचा अनुभव सांगितला.

प्रास्ताविकात डॉ. पी. पी. शेळके यांनी शेतकऱ्यांसाठी पौष्टिक आहार व प्रत्येक कुटुंब प्रमुखांनी परसबाग निर्मिती करावी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर जमलेल्या सर्व शेतकऱ्यांनी किसानों केले लिए खाद्य एवं पोषण या विषयावरील केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी, डॉ. त्रिलोचनसिंह महापात्रा यांचे भाषण दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ठाकरे यांनी केले तर राजेश भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.  या कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकरी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*****

No comments: