आंतरजातीय
विवाह केलेल्या दाम्पत्यांनी
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घ्यावा
हिंगोली (जिमाका), दि.22
: देशातील
जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी. या दृष्टिकोनातून केंद्र
शासनाची डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सन 2014-15 पासून
सुरु करण्यात आली आहे. आंतरराजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांना या योजनेंतर्गत
दोन लाख पन्नास हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
आंतरजातीय विवाहित दाम्पत्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.
विवाहाच्या एक वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ
घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, पासपोर्ट फोटो, विवाह नोंद प्रमाणपत्र, जातीचे
प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), तहसीलदाराचे
उत्पन्न प्रमाणपत्र (मर्यादा 5 लाख रुपयाच्या आत), आधार कार्ड, पॅन कार्ड, पती
पत्नीच्या नावाने संयुक्त बँक खाते क्रमांक, जिल्ह्यातील खासदारांचे शिफारस
प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ
घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली
कार्यालयास प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच.
एडके यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment