01 September, 2016

जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

हिंगोली, दि. 01 :-  जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दिनांक 29 ऑगस्ट, 2016 रोजीचे 06.00 वा. पासुन ते दि. 12 सप्टेंबर, 2016 रात्रीच्या 24 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी लतीफ पठाण यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात आगामी काळात दि. 01 सप्टेंबर, 2016 पोळा, दि. 04 सप्टेंबर, 2016 रोजी हरितालीका तसेच दि. 05 सप्टेंबर, 2016 रोजी गणेश चतुर्थी, व दि. 12 सप्टेंबर, 2016 रोजी बकरी ईद असे सन व उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. तसेच हिंगोली जिल्हयात व राज्यात घडत असलेल्या घटनांच्या अनुषंगाने   राजकीय घडामोडी वक्तव्ये व येथील राजकीय पक्ष शाखा यांचेकडून जिल्ह्यामध्ये विविध पक्ष संघटना यांचेकडून आपल्या मागण्या करीता धरणे, मोर्चे, रास्तारोको, आमरण उपोषणे, बंद, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सारखे आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दरम्यान उदभवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्हयात दि. 29 ऑगस्ट, 2016 रोजीचे 6.00 वा. पासुन ते 12 सप्टेंबर, 2016 रोजीचे 24.00 वा. पावेतो मुंबई पोलिस कायदा 1951 कलम 37 (1) (3) चे आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
                                                            **** 


No comments: