24 September, 2016

नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा
--- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
          हिंगोली, दि. 24 :- येथील जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी जिल्ह्यात 48 तासात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी होण्याचे संकेत दिले आहेत. तसेच नदीकाठच्या गावांना सावधगिरीची सुचना दिल्या आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी / नागरिक यांना खालील खबरदारी घेण्याबाबत कळविले आहे.
                विशेषत: शेतकऱ्यांनी विजांचा कडकडाट होत असतांना शेतीचे काम करु नये. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे व स्वत: सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ जाऊ नये. तसेच आपल्या मुलांना जलसाठ्याजवळ पोहण्यासाठी पाठवू नये. ( शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सुचित करावे.) पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये.

*****

No comments: