14 May, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय पथकाने घेतला जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा



हिंगोली,दि.14: कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, तसेच प्रतिबंधीत क्षेत्रात लॉकडाउनच्या कालावधीत प्रतिबंधीत आदेशाची प्रभावीपणे अमंलबजावणी व्हावी तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरीता आज उप आयुक्त वर्षा ठाकूर आणि उप आयुक्त पराग सोमण हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी उप आयुक्त वर्षा ठाकूर, उप आयुक्त पराग सोमण यांनी साई रिसॉर्ट आणि राज्य राखीव पोलीस दल येथे क्वॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आलेले जवान तसेच जिल्हा रुग्णालयातील भरती असलेल्या जवानांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारणा करुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. तसेच हिंगोली येथील मुलांच्या वसतीगृहात तयार करण्यात आलेल्या कोवीड रुग्णालय आणि औंढा येथील कोवीड केअर सेंटरला भेट देवून पाहणी केली. याठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करुन काही त्रूटींची पूर्तता करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी केलेल्या  पूर्वनियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी उप आयुक्त वर्षा ठाकूर आणि उप आयुक्त पराग सोमण यांनी जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत विविध बाबींचा आढावा घेवून सूचना दिल्या. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांनी घरामध्ये राहूनच सुरक्षितता बाळगावी, सार्वजनीक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी करण्यात येत आहे. बाहेरील जिल्ह्यात किंवा राज्यात कामासाठी स्थलांरीत मजूर व कामगार हे आता जमेल त्या पध्दतीने आप-आपल्या गावाकडे परत येत आहेत. परत येणाऱ्या सर्व नागरिकांची जिल्ह्याच्या सिमेवर तयार करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर सतर्क राहून तपासणी करावी. या नागरिकांना कुठल्याही आजरासंदर्भात शंका वाटल्यास त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करावेत. तसेच जिल्ह्यात परत येणाऱ्या प्रत्येक मजूर व कामगारापासून कोरोनाचा प्रार्दूभाव होणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने घेणे आवश्यक आहे. तपासणी नाक्यावर बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याकरीता प्रशिक्षीत कर्मचाऱ्याची नाक्यावर नियुक्ती करण्यात यावी. तसेच याठिकाणी तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालूका आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी भेटी देवून योग्यरित्या तपासणी होत असल्याची खात्री करावी. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची योग्यरित्या तपासणी न झाल्यास त्यांच्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता जिल्ह्याच्या सिमेवरील सर्व तपासणी नाक्यावर नागरिकांची तपासणी योग्यरितेने होणे अत्यंत आवश्यक आहे. बाहेर जिल्ह्यातील किंवा राज्यातील ज्या नागरिकांना आपल्या गावी जायचे असल्यास त्यांना सहकार्य करा. तसेच इतर आजाराच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी खाजगी रुग्णालये सुरु करण्याचा प्रयत्न करावा. तसेच विशेष करुन गर्भवती महिलांना योग्य ती वैद्यकीय सेवा मिळेल याकरीता विशेष नियोजन करा.  
जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्यास किराणा आणि भाजीपाला विक्रेत्यांची बैठक घेवून त्यांना नियमाचे पालन करण्याबाबत निर्देश द्यावे. तसेच नियमाचे पालन होत असल्याचे प्रत्यक्ष जावून तपासणी करण्याच्या सूचना उप आयुक्त वर्षा ठाकूर आणि उप आयुक्त पराग सोमण यांनी आज दिल्या.
यावेळी विभागीय पथकाने कोरोना विषयक उपाययोजनांची पाहणी करुन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा आणि पोलीस अधिक्षक योगेशकुमार यांची भेट घेूवन चर्चा केली. तसेच करण्यात आलेल्या उपाययोजना बाबत ज्या काही आवश्यक सुधारणा करावयाच्या आहेत. त्याबाबत संबंधीत विभागांना सूचना देवून त्याची पूर्तता करुन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत यावेळी उप आयुक्त वर्षा ठाकूर, उप आयुक्त पराग सोमण, प्रभारी विकास उप आयुक्त वीणा सुपेकर, विभागीय आरोग्य उपसंचालक स्वप्नील लाळे, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, उप मुख्याधिकारी धन्वंतकुमार माळी, उप मुख्याधिकारी नितीन दाताळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जायभाय, हिंगोली नपचे मुख्याधिकारी रामदास पाटील आणि सेनगाव नपचे शैलेश फडसे यांची उपस्थिती होती. 
****


No comments: