03 May, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खते, बि-बियाणांची दुकाने व परवानाधारक कृषि केंद्रे सुरु ठेवण्याकरीता वेळापत्रक जाहिर



·   दिलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन दुकाने सुरु ठेवण्याचे निर्देश

हिंगोली,दि.03: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक निर्माण होऊ शकतो. यामुळे  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
खरीब हंगाम हा जवळ येत आहे व व्यापा-यांना खते व बियाणेचा साठा करण्यासाठी तसेच शेतीसाठी उपयोगी महत्वाचे साहित्य जसे की, ड्रीप, स्पिंकलर व पाईप पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे करीता ही सर्व दुकाने व जिल्ह्यातील परवाना धारक कृषी केंद्र उघडणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन सुरु ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत.
अ.क्र.
दिनांक
वार
वेळ

1
04/05/2020
सोमवार




   सकाळी 09.00 ते दु.1.00 वाजेपर्यंत

2
06/05/2020
बुधवार
3
08/05/2020
शुक्रवार
4
10/05/2020
रविवार
5
12/05/2020
मंगळवार
6
14/05/2020
गुरुवार
7
16/05/2020
शनिवार

सदरील उद्योग सुरु करते वेळेस काही अटी व शर्तीचे पालन करने बंधनकारक राहील, त्या पुढील प्रमाणे आहेत. संबंधितांनी दि. 04 मे, 2020 पासुन दुकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दुकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नाव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक. तसेच दुकानदारानी व त्यांच्या सोबत काम करणा-या कामगारांनी नेहमीच नाक व तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच सॅनिटायझर्स उपलब्ध ठेवण्यात यावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखावेत. दररोज कामावर येणा-या कामगारांची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करण्यात यावी. दुकानदारांनी कामगारांसाठी मास्क व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारांसाठी पिण्याच्या, हात धुण्याच्या पाण्याची व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योग धंद्याच्या ठिकाणी व परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षततेच्या उपाय योजनांची माहिती फलक लावण्यात यावेत.
आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     
****

No comments: