09 May, 2020

पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांधावर खत वितरणाचा शुभारंभ



हिंगोली,दि.09: राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड या हिंगोली दौऱ्यावर आल्या होत्या. खरीप हंगाम जवळ आल्याने याप्रसंगी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रा. गायकवाड यांच्या शेतकऱ्यांना बांधावर खत वितरणांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड यांच्या हस्ते हिंगोली तालूक्यातील उमरा येथील अमृतेश्वर शेतकरी गट 1 आणि 2, हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील विजय शेतकरी गट 1 आणि 2 या  एकुण 25 टन खताचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
****



No comments: