01 March, 2021

संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील शेतमाल बाहेर जिल्ह्यात घेऊन जाण्यास परवानगी --- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आदेश

 


हिंगोली, (जिमाका) दि. 01 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोवडि-19 बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात 7 दिवस संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील शेतमाल बाहेर जिल्ह्यात घेऊन जाण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी परवानगी दिली आहे.

यासाठी संबंधित शेतकरी , व्यापारी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन कोरोना अँटीजेन तपासणी करुन घ्यावी व चाचणीचा अहवाल घ्यावा. त्यानुसार ज्यांची कोरोना अँटीजेन चाचणी निगेटीव्ह प्राप्त झाली आहे अशा शेतकरी, व्यापारी यांना तहसील कार्यालयामार्फत परवानगी घ्यावी. तहसील कार्यालयाने संबंधित शेतकरी, व्यापारी यांना बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी सर्व बाबींची तपासणी करुन एका गाडीत केवळ वाहक व इतर दोन अशी परवानगी द्यावी, असे आदेश दिले आहेत.

या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

*******

No comments: