23 March, 2017

जिल्ह्यात अधिनियम 1951 चे (37) (1)(3) कलम लागू 

        हिंगोली,दि.23:- जिल्ह्यात सार्वजनिक शातंता आणि सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम (37) (1)(3) चे आदेश दिनांक 21 मार्च, 2017 रोजीच्या 6-00 वाजल्यापासून ते दिनांक 4 एप्रिल, 2017 रोजीच्या 24-00 वाजेर्यंत हा आदेश लागू करण्यात आला आहे.
                या आदेशान्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी , तलवार, बंदुका बाळगणार नाही. लाठ्या किंवा काठ्या , शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभुत ठरतील , सहज हाताळता येतील अशा वस्तुजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, विटबंनात्मक नकला किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणा नाही. सभ्यता , नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वजवणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. जिल्ह्यात पाच किंवा अधिक व्यक्ती रस्तयावर जमण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. सदर आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधीकारी किंवा इतर कोणतेही शासकीय कर्मचारी, विवाह,अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व त्याचप्रमाणे इतर कार्यक्रम ज्यांना सक्षम अधिकारी यांनी विशेष परवानगी दिलेल्या अशा मिरवणुकीसस व कार्यक्रमास लागु होणार नाही. विशेषरित्या परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, हिंगोली किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकारी यांना राहतील. हे आदेश जिल्ह्याच्या हद्दीपावेतो लागू करीत आहे.  
****  

No comments: