29 April, 2017

 जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक
 जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
हिंगोली दि. 29 :- जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.  
यावेळी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठकीत एकूण अकरा प्रकरणे निर्णयासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी पाच प्रकरणे पात्र, एक अपात्र  व पाच प्रकरणे फेरचौकशीसाठी ठेवण्याबाबत समितीच्या उपस्थित सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला.         
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री. कांबळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी , जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे, वसमत पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत दळवी, शेतकरी प्रतिनिधी अशासकीय सदस्य गणेशराव नाईकवाल             (कारेगावकर), सर्व संबंधित तहसीलदार , सर्व संबंधित तालुका कृषी अधिकारी, सर्व संबंधित पोलीस निरीक्षक तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख यांची यावेळी बैठकीस उपस्थिती होती.  
*****  


No comments: