27 December, 2017

रब्बी हंगाम 2017-18 करीता पिक संरक्षणात्मक पाणी पाळीसाठी पाणी अर्ज मागविण्याबाबत जाहीर निवेदन



वृत्त क्र.586                                                                           दिनांक : 27 डिसेंबर 2017
रब्बी हंगाम 2017-18 करीता पिक संरक्षणात्मक पाणी पाळीसाठी
पाणी अर्ज मागविण्याबाबत जाहीर निवेदन
        हिंगोली, दि.27:- उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजवा कालवा  कि.मी.119 व इसापूर डावा कालवा कि.मी.84 पर्यंतच्या वितरण  व्यवस्थेअंतर्गत लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांना कळविण्यात येते की, सिंचन वर्ष 2017-18 मध्ये इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने रब्बी हंगामाच्या प्रारंभी धरणात केवळ 14 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या  लाभक्षेत्रात रब्बी हंगामाकरिता सिंचन कार्यक्रम पुर्णपणे राबविणे शक्य होणार नाही . सद्य:स्थितीत उपलब्ध पाणीसाठ्यातून लाभक्षेत्रातील उभी हंगामी व बारमाही पिकांना संरक्षणात्मक एक पाणी पाळी डिसेंबर 2017 अखेर देण्याचे प्रस्तावित आहे.त्यानुसार उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बागायतदारांना कळविण्यात येते की, नमुना 7 व 7 अ मध्ये पाणी अर्ज मागविण्यात येत आहेत . खालील दर्शविलेल्या शर्तीस व शासनाच्या प्रचलित अनुसरुन पाणी अर्जास मंजुरी देण्यात येईल. हंगामाची मुदत दिनांक 15 ऑक्टोबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018, पिकाचे नाव –उभ्या पिकांना संरक्षणात्मक पाणी पाळी , पाणी अर्जाचा विहित नमुना क्र. 7 व 7 अ संबंधित शाखा कार्यालयात विनामुल्य मिळेल , सदर पाणी अर्जात पिकाची  मागण 20 आर च्या पटीत  नोंदवावी , अर्जातील  पूर्ण माहिती भरुन पाणी अर्ज  कार्यालयीन वेळेत शाखा कार्यालयात  दाखल  करुन त्याची  पोच पावती घ्यावी , पाणी अर्ज  भरतेवेळेस थकबाकीदार  लाभधारकांनी  मागील  थकबाकी व चालू पिकांची अग्रीम पाणीपट्टी  भरुन सहकार्य करावे म्हणले दिलेला पाणी अर्ज  मंजूर होईल , नियमानुसार  पाणीपट्टी भरणा न केल्यास पाणी अर्ज नामंजूर  होईल  तेव्हा  नामंजूर  क्षेत्रास कालव्याद्वारे पाणी पुरवठा  करणे बंधनकारक  राहणार नाही ,  मंजूर  क्षेत्रासच कालव्याचे पाणी अग्रक्रमाणे देण्यात येईल, नामंजूर व अनधिकृत क्षेत्रास  कालव्याचे  पाणी देण्याची जबाबदारी  पाटबंधारे  विभागावर राहणार नाही तेव्हा  कृपया मंजूरी  घेऊनच  पिकांचे नियोजन करावे ,  उडाप्याचे  व वितरिका, मायनरच्या टेलच्या भागातील क्षेत्रास  परवानगी  दिली जाणार नाही ,  तेव्हा कालव्याच्या  पाण्यावर  विसंबून  पिके घेऊ नयेत , याची नोंद  घ्यावी व या व्यतिरिक्त  टेलच्या भागात  पिके घेतल्यास  व पाण्याअभावी  पिके वाळल्यास  त्यास पाटबंधारे  विभाग जबाबदार राहणार नाही ,  प्रत्येक  लाभधारकांनी  ठरवून दिलेल्या  तारखेप्रमाणेच पिकास पाणी घ्यावे , तसेच दिवसरात्र पाणी घेणे  बंधनकारक  आहे , दिवसा किंवा रात्री जेव्हा पाणी पाळी येईल तेव्हा पाणी घेतले नाहीतर  नदी / नाल्यास  पाणी वाया  जाते त्यामुळे  सिंचनाचा  कालावधी  वाढतो पर्यायाने पाणी पाळी  अंतरात वाढ होते . त्यामुळे असे पाणी वाया गेल्यास ठराविक  मुदतीत पाणी देणे  शक्य होणार नाही व त्याचे जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही . याची सर्व लाभधारकांनी  गांर्भियाने नोंद घ्यावी , सिंचन करतेवेळी मंजूर क्षेत्राचा पास जवळ ठेवावा , कमी पाण्यात व कमी वेळात  सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपत्तीचा काटेकोरपणे वापर करावा , पाणी नाश कटाक्षाने टाळावा , नैसर्गिक आपत्ती व काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव  पाणी पुरवठा  करणे शक्य न झाल्यास व त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास  त्याची जबाबदारी  पाटबंधारे  विभागावर  राहणार नाही  तसेच महाराष्ट्र पाटबंधारे  प्रचलित नियमानुसार शर्ती व अटीचे  उल्लंघन झाल्यास लाभधारकास आगाऊ सूचना  न देता दिलेली मंजुरी रद्द  करण्यात येईल व पाणी पुरवठा बंद करण्यात येईल , सिंचन नियमांचे पालन करणे प्रत्येक लाभधारकास बंधन कारक राहील, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितावर शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, पाणी वापर संस्थांनी पाणी पाळीतच संस्थेचे क्षेत्र भिजवून घ्यावे , असे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.1 , नांदेड यांनी कळविले आहे.
000000

No comments: