12 December, 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत हिंगोली जिल्ह्यातील 9 हजार 410 शेतकऱ्यांना 40 कोटी 85 लाख रुपयांचा कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाख



वृत्त क्र.572                                               दिनांक : 12 डिसेंबर 2017
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत
हिंगोली जिल्ह्यातील  9 हजार 410 शेतकऱ्यांना
40 कोटी 85 लाख रुपयांचा कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाख
 हिंगोली, दि. 12 :- राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय घेऊन कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यास शासन प्रयत्नशील आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण 9 हजार  410 शेतकऱ्यांच्या खात्यात 40 कोटी 85 लाख रुपये जमा केले आहेत. जिल्ह्यात डिसेंबर 2017 पासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून ती आता पुर्णत्वाच्या टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एस.पी. मैत्रेवार यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात  परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 11 डिसेंबर 2017 अखेर 3 हजार 40 शेतकऱ्यांच्या खात्यात 5 कोटी 58 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तर प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात 737 शेतकऱ्यांच्या खात्यात 82 लाख रुपये जमा करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयकृत / ग्रामीण बँकांकडून 11 डिसेंबर 2017 अखेर 1 हजार 851 शेतकऱ्यांच्या खात्यात  10 कोटी 76 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.  तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत 11 डिसेंबर 2017 अखेर  4 हजार 52 शेतकऱ्यांच्या खात्यात  23 कोटी 69 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे  हिंगोली जिल्ह्यात एकूण 9 हजार  410 शेतकऱ्यांच्या खात्यात 40 कोटी 85 लाख  रुपये जमा केले आहेत.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशासन बँक स्तरावरुन कर्जाची माहिती लेखापरीक्षण करुन माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट बँकांना देण्यात आली आहे. या यादीनुसार बँकेमार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी प्रोत्साहनपर लाभाची रक्कम हस्तांतरीत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रोत्साहनपर रकमेचा लाभ बँकेकडून प्रत्यक्ष दिला जात आहे त्यांना बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीद्वारे एसएमएस संदेश पाठविण्यात येणार आहेत.
            ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना किंवा बँकांकडून कर्जाबाबत माहिती भरताना काही त्रुटी राहिल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या माहितीची दुरुस्ती तालुकास्तरीय समितीकडून करण्यात येत असून उर्वरीत सर्व पात्र शेतकरी या योजनेपासून वंच राहणार नाही तसेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रशासनाकडून पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे, असेही जिल्हा उपनिबंधक  श्री. मैत्रेवार यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून  या योजनेंतर्गत 77 लाख अर्ज प्राप्त झाले असून  छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून त्यापैकी जवळपास41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आले असून जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेणार येणार असून  शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल. 00000

No comments: