12 June, 2025

बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्ह्यात 'स्टॉप डायरिया अभियान' यशस्वीपणे राबवा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै या कालावधीत राबविणार अभियान हिंगोली (जिमाका), दि. 12 : अतिसारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्ह्यात दि. 16 जून ते 31 जुलै, 2025 या कालावधीत विविध उपक्रम राबवून 'स्टॉप डायरिया अभियान' यशस्वीरित्या राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि. 10 जून रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली स्टॉप डायरियाबाबत जिल्हा सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेजा स्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही. आर. वाकडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. स्टॉप डायरियाचे उद्दिष्ट राज्यातील अर्भक मृत्यूदर, बालमृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशामध्ये 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्युमागे अतिसार हे प्रमुख कारण असून सुमारे 1 ते 7 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि त्या बालमृत्युचे प्रमाण उन्हाळा व पावसाळ्यात जास्त असते. ‘अतिसारावर करा मात, स्वच्छता व ओआरएसची घेऊनी साथ’ या घोषवाक्याचा अवलंब करुन 'स्टॉप डायरिया' अभियान यशस्वीपणे राबवावे. अतिसार झालेल्या सर्व मुलांकरिता ओआरएस आणि झिंकचे वाटप होईल व त्यांच्यामार्फत ते पोहचेल हे सुनिश्चित होईल. पाच वर्षाखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंधक आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे काळजी घेणाऱ्यांचे योग्य समुपदेश करावे. स्टॉप डायरियाचे ध्येय अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर पोहचविणे हे अंतिम ध्येय आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार होतात. सर्व ग्रामपंचायतीमध्ये जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै दरम्यान अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग व ग्रामपंचायत विभाग आदीच्या संयुक्त विद्यामाने राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालय व प्राथमिक शाळा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता असणे आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुक करुन पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येते. यासाठी गावस्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे. या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. डी. व्ही सावंत, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ. स्नेहल नगरे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखापाल व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, सांख्यिकी अधिकारी अजय कदम, डॉ निशांत थोरात, डॉ. प्रशांत पुठावार, डीपीएचएन मनीषा वडकुते, अमोल कुलकर्णी, अझर अली, लक्ष्मण गाभने, सुरभी शाहू आदी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: