20 August, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त प्रतिज्ञा  

हिंगोली, दि.20:- भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती दिवस हा सद् भावना दिवस येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त जिल्हाधिकारी                      श्री. अनिल भंडारी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद् भावना दिनाची शपथ दिली .
" मी प्रतिज्ञा करतो / करते की, मी जात, वंश, धर्म प्रदेश किंवा भाषा विषयक, भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे, भावनिक एैक्य आणि सामंजस्य, यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे, सर्व प्रकारचे मतभेद, मी हिंसाचाराचा अवलंब न करता, विचार विनिमय करुन, व संविधानिक मार्गानी सोडवीन."   
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) ए.के.तडवी, उपविभागीय अधिकारी अमित शेंडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक आकाश कुलकर्णी आदिसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

*****

 

No comments: