30 August, 2016

महाअवयदान जनजागृती फेरी
हिंगोली, दि. 30 :- अवयवदान जनजागृती करण्याबाबत महाअभियान सन -2016 दिनांक 30 ऑगस्ट, 2016 ते दिनांक 1 सप्टेंबर, 2016 दरम्यान जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, हिंगोलीमार्फत आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जनतेतून अवयव दानाला चालना मिळवी याकरिता महाअवयवदान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी  जिल्हा रुग्णालय येथील महाअवयवदान  प्रभातफेरीस हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात केला.
सदर जनजागृती फेरीची सुरुवात करुन जिल्हा रुग्णालय हिंगोली येथून तहसील कार्यालय-शासकीय विश्रामगृह चौक-भारतीय विद्या मंदिर - जवाहर रोड मार्गे- गांधी चौक येथे समारोप करण्यात आला .
यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती अनिता सुर्यतळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, बालरोतज्ज्ञ डॉ. गापाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी श्री. चंद्रकांत शेरखाने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बाबासाहेब रोडगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दत्ता धनवे , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, समाजसेवक धरमचंद बडेरा, तसेच दंत महाविद्यालय व आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थी , प्राध्यापक आदींची उपस्थिती यावेळी होती.    
यावेळी नगराध्यक्षा श्रीमती अनिता सुर्यतळ म्हणाल्या की, अवयव दान हेच, श्रेष्ठ दान अूसन याकरिता सर्वांनी सदर अभियानात आपले नांव नोंदणी करावी. समाजामध्ये अवयवदानाविषयी जनजागृती करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी अवयवदान करण्यासंदर्भातील सर्व उपस्थितांना सविस्तर माहिती देत अवयवदानाचे महत्व पटवून दिले.
तसेच दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीनी व विद्यार्थ्यांनी कु. मिरा आसवा, कांचन गापछडे, आदर्श महाविद्यालयाची विद्यार्थिंनी प्रियंका दिंद्रे यांनीही महाअवयवदानाविषयीची आपली मनोगते व्यक्त केली. महाअवयवदान अभियानात अनेक विद्यार्थींनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने अवयव दानाचे अर्ज भरुन दिले.  
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उध्दव कदम यांनी केले, तर समारोप जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी  केला.  

****











 

No comments: