जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मिळणार
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ
- पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली,23: केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’
चा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून, या आरोग्य
योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मोफत उपचाराचा लाभ
मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’
च्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी
आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा
परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी
जगदिश मिनियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या योजनेचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा यासाठी आशाताई
सेविकांची जबाबदारी वाढली आहे. तसेच लोकप्रतिनीधीनी देखील या योजेनेचा व्यापक प्रचार प्रसिध्दी करुन
नागरिकांना या महत्वाच्या योजनेची माहिती करुन द्यावी असे ही पालकमंत्री कांबळे
यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, आज आरोग्य क्षेत्रामध्ये
क्रांतीकारी योजनेची सुरुवात झाली आहे. सन 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक,
आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार कुटुंबांची निवड आयुष्मान जन आरोग्य
योजनेतंर्गत करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेवून नागरिकांनी आपल्या जीवन आणि
आरोग्य सुरक्षीत करावे. तसेच या योजनेबाबत अधिक माहितीकरीता 14555 या हेल्पलाईन क्रमांकावर
संपर्क साधावा.
यावेळी आयुष्यमान भारत योजने सोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन
आरोग्य योजना एकत्रितरित्या राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा यावेळी निवडक
लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘ई-कार्ड’चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम
यांनी केले तर डॉ. कवटे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने
अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, आशाताई सेविका, नागरिकांची मोठ्या
उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment