14 September, 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2018-19 अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2018-19 अंतर्गत
अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.14: जिल्हयातील अनु.जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू  शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या / शासकीय वतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधाअभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्यापैकी इयत्ता 11 वी 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महावीद्यालयायत /शीक्षण संस्था मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहा मधील मुलां- मुलींप्रमाणे भोजन,निवास, शैक्षणीक साहीत्य,निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुवीधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. सदर योजने अंतर्गत सन 2018-19 करीता अर्ज करण्यासाठी अंतीम मुदत दिनांक 30 सप्टेंबर 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावा राहील. सदर योजने अंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत .
योजनेचे निकष : विद्यार्थी  शासकीय वसतिगृहास प्रवेश घेण्यास पात्र असावा,विद्यार्थी महाराष्ट्राचा रहीवाशी असावा,शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने  प्रवेश घेतलेला असावा,विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा,विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारत असेल,या योजनेसाठी सामाजिक न्यायविभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनु.जाती व व नवबौध्द वीद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल,विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेडयूल्ड बँके खाते उघडले आहे . त्या खात्याशी संलग्न करणे  बंधनकारक असेल,सदर योजनेला लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे,विद्यार्थी स्थानीक रहीवाशी नसावा. (ज्या महाविद्यालय /शैक्षणीक संस्थेत विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला आहे. तो विद्यार्थी ते महावीद्यालय / शैक्षणीक संस्था ज्या महानगर पालिक / ग्रामपंचायत यांच्या हददीत आहे त्या महानगर पालिका / ग्रामपंचायत येथील रहीवाशी नसावा.),महानगर पालीकेच्या हद्रदी पासून 5 कि.मी. परीसरात असलेल्या महाविद्यालय/शीक्षण संस्थेत शीकत असलेले वीद्यार्थी सुध्दा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील,विद्यार्थी 11 वी ,12 वी आणि त्यानंतरचे उच्च शीक्षण घेणारा असावा,12 वी मध्ये विद्यार्थ्यांस किमान 50 टक्के गुण असल्यावर या योजनेचा पुढे पदवी /पदव्युत्तर शीक्षणासाठी लाभ घेता येईल,या योजनेचा पुढे लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमाचे मागील प्रत्येक शैक्षणीक वर्षात्‍ कीमान 5‍0 % गुण कींवा त्याप्रमाणात ग्रेडेशन /CGPA असणे आवश्यक राहील,विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षापेक्षा कमी नसावा,विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल, या योजनेमध्ये दिव्यांग (अनु.जाती व नवबौध्द घटकातील)विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. त्यांना गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील,या योजनेसाठी खासबाब सवलत लागू राहणार नाही.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (साक्षांकीत प्रती)
             जातीचा दाखला, महाराष्ट्राचा रहीवाशी असल्याचा पुरावा,आधार कार्डाची प्रत, बँक पासबूक झेरॉक्स,उत्पनाचे प्रमाणपत्र / फॉर्म नंबर 16,विद्यार्थी दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, इयत्ता 10 वी, 12 वी, व पदवी परिक्षेचे गुणपत्रक, महावीद्यालयाचे बोनाफाईट सर्टिफीकेट,विद्यार्थीनीने विवाहीत असल्यास पतीचा उत्पन्नाचा पुरावा,बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा,विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, स्थानीक रहीवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र,विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा.(खाजगी वसतीगृह, भाडे करारनामा इ.),महावीद्यालयाचे उपस्थीती प्रमाणपत्र, सत्र परीक्षेच्या नीकालाची प्रत.
           या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्याजिल्हयामध्ये शीकत आहे त्या जील्हयाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  यांचेकडे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, विद्यार्थ्यांची महावीद्यालयातील उपस्थीती कीमान 75 टक्के आवश्यक राहील. याबाबत संबधीत संस्थेचे प्रत्येक सहामाही उपस्थीती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील,विद्यार्थ्यांने खोटी माहीती अथवा कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयन्त केल्यास कींवा  शैक्षणीक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नौकरी व व्यावसाय करत असल्यास आणि  इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर गेल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसूली केली जाईल, असे भाऊराव चव्हाण,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांनी केले आहे.
00000

No comments: