24 February, 2022

 


नेहरु युवा केंद्राच्या वतीने युवकांसाठी

आत्मनिर्भर भारत या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण संपन्न

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : नेहरु युवा केंद्राच्या वतीने येथील चैतन्य करिअर अकॅडमीमध्ये आत्मनिर्भर भारत या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री. गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व प्रशिक्षक म्हणून श्री.कोकाटे, श्री.दहिफळे, श्री.नागरे हे उपस्थित होते.

या प्रशिक्षणामध्ये युवकांना आत्मनिर्भर ही  संकल्पना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून आली असल्याची माहिती युवकांना दिली. तसेच आत्मनिर्भर भारत ही संकल्पना काय आहे, तिचा उद्देश काय आहे, ती कशी आत्मसात केली पाहिजे आणि आपला भारत देश आत्मनिर्भर कसा होईल याविषयी माहिती दिली. आत्मनिर्भर होणे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वत: काहीतरी करुन दाखवणे असा आहे. आपल्या भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी भारतातील सर्व युवकांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. तसेच युवकांनी नवनवीन काही शिकले पाहिजे व स्वत:ला सिध्द केले पाहिजे असे मार्गदर्शन प्रशिक्षकांनी यावेळी केले.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये ग्रामीण भागातील अनेक युवक, युवती उपस्थित होते. हे प्रशिक्षण नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी हिंगोली तालुका समन्वयक प्रविण पांडे, संदीप शिंदे, सिंधू केंद्रे, नामदेव फरकडे यांनी परिश्रम घेतले.    

****** 

No comments: