24 August, 2022

 

माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी

15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 24 : महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत सन 2022 मध्ये इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी परिक्षेत किमान 60 टक्के गुण प्राप्त करुन पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे.

ज्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी इयत्ता 10 वी, 12 वी मध्ये 60 टक्के गुण प्राप्त केले आहेत. अशांनी दि. 15 ऑक्टोबर, 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे अर्ज सादर करावेत.

अर्जासोबत इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असलेल्या इयत्तेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, केंद्र, राज्य शासनाची, इतर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा, महाविद्यालयाचा, संस्थेंच्या प्राचार्याचा दाखला, ज्या पाल्यांनी सीईटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे, अशा पाल्यांना प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट (स्वयंघोषणापत्र), माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची किंवा राशन कार्डाची छायांकित प्रत, मुलीचे वय 18 पेक्षा जास्त असल्यास मुलगी अविवाहित असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, आर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डाची छायांकित प्रत (दोन्ही बाजू), राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिलया पानाची छायांकित प्रत, आधार कार्ड आदी कागदपत्रे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

***** 

No comments: