18 August, 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस साजरा



 

हिंगोली (जिमाका), दि.18 : भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्वांनी सामंजस्याने कार्य करणे आणि अहिंसा व संविधानाच्या मार्गाने मतभेद सोडविण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातील सदभावना दिवसाची प्रतिज्ञा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना दिली.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन सामुहिक प्रतिज्ञा घेतली.

******  

No comments: