26 April, 2017

जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत केली कामाची पाहणी
        हिंगोली, दि. 26 :  लघुसिंचन ( जलसंधारण ) विभागाकडून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत होत असलेल्या कामाची जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पाहणी केली.
सदरील काम पाहणीच्या वेळी लघु सिंचन (जलसंधारण) विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. साहु, सहाय्यक अभियंता श्रेणी - 1 पी. एस. खिराडे, उपविभागीय अधिकारी ए. आर. अशरफी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जे. पी. वाबळे व संबंधित गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते.
             जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामाच्या पाहणी अंतर्गत जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी मौजे पेडगांव ता. हिंगोली येथील सिमेंट नाला बांध क्र. 1 व 2 ची पाहणी केली. दोन्ही कामे भौतिक दृष्ट्यापुर्ण झाले असून नाला खोलीकरण पक्के खडकापर्यंत पुर्ण झालेले असून पिचींग काम शिल्लक आहे. कामाची लांबी 16 मीटर असून साठवण क्षमता 5 टीसीएम आहे. कामे गुणवत्तापुर्वक झालेले असून किरकोळ कामे पावसाळ्यापूर्वी करावे अशा प्रकारच्या सुचना दिल्या. सिमेंट नाला बांध क्र. 2 हा गावाजवळील पाण्याच्या विहीरीजवळ असल्यामुळे त्यांचा फायदा होईल व खरीप हंगामासाठी सुरक्षित सिंचन उपलब्ध होऊन पाणी पातळीत वाढ होईल, असे जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधुन चर्चा केली.
            तसेच मौजे मसोड ता. कळमनुरी येथील सिमेंट नाला बांध क्र. 1 व 2 ची पाहणी केली. सदरील काम प्रगतीपथावर असून सिमेंट कॉक्रींटचे काम चालु होते. प्रत्यक्ष कामावर मोठ्या आकाराची खडी आढळून आली असता लहान आकाराची खडी वापरण्याबाबत सुचना दिल्या. तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी कामे गुणवत्तापुर्वक चालु असल्याबाबत सांगितले. नाला खोलीकरणाचे काम चांगले झाले असून 10 टी. सी. एम. पाणी साठा निर्माण होणार आहे. तसेच 10 हेक्टर सिंचन खरीपामध्ये सुरक्षित सिंचन होणार आहे. तसेच 2016-17 मधील सिमेंट बंधारे 2 जून, 2017 पर्यंत पुर्ण करण्याचे सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. तसेच मौजे शिवणी ता. कळमनुरी येथील जलसंधारण महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या व्दारयुक्त सिमेंट बंधाऱ्याची देखील पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या बंधाऱ्यामुळे 15 टी. सी. एम. पाणीसाठा होणार आहे.        

                                                                                                *****




 
हिवताप आजाराचे उच्चाटन करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन
        हिंगोली, दि. 26 :  जिल्हा हिवताप कार्यालय, हिंगोली तर्फे जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. जयदिप देशमुख, दलितमित्र व ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय निलावार, नेत्ररोग तज्ञ डॉ. किशन लखमावार, बालरोग तज्ञ डॉ. दिपक मोरे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बंदखडके यांच्या उपस्थितीमध्ये सामुहिक हिवताप या आजाराचे उच्चाटन करणेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच डॉ. विजय निलावार यांनी हिवताप आजाराविषयी आरोग्य यंत्रणेला दोष देणे योग्य बाब नसल्याबाबत मत व्यक्त केले व जनतेने आपल्या सभोवताचा परिसर स्वच्छ ठेऊन सांडपाणी साचणार नाही व डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
            डॉ. आकाश कुलकर्णी यांनी एक दिवस कार्यक्रम राबवुन हिवताप आजाराचे उच्चाटन होणार नसून जनतेने पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेऊन डासोत्पत्ती होऊ नये म्हणून प्रयत्न्‍ करावे. आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन केले. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा, सभोवतालच्या परिसरामध्ये डबकी साचु देऊ नयेत. तसेच हिवताप हा आजार मुख्यत्वे गरोदर महिला व लहान बालकांना होत असल्यामुळे डासांपासून संरक्षण करणेसंबंधी घराच्या खिडक्यांना जाळी बसवावी अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
            तसेच सर्व मान्यवरांचे, कर्मचारी वृंदांचे व उपस्थितांचे डॉ. गजानन चव्हाण यांनी आभार मानले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथून भव्य दुचाकी रॅलीचे मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घघाटन करण्यात आले. त्यानंतर सदर रॅलीचे जिल्हा हिवताप कार्यालय येथे विसर्जन करण्यात आले. जिल्हा हिवताप कार्यालय येथे उत्कृष्ठ कर्मचाऱ्यांचा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. गोलाईतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सी. जी. रणवीर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. एम. गवळी, यु. टी. डाफणे, आर. बी. जोशी, आर. एस. दरगू, बी. आर. कुटे, एस. व्ही. नाईक, श्री. पुंडगे, श्री. महात्मे, प्रज्योत इंगोले, एस. पी. दहातोंडे, एस. पी. काळे, एम. एम. घुले, ए. एम. मुंढे, बी. के. मस्के, श्री. नलगे, श्री. पतंगे तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

                                                                                                ***** 

24 April, 2017

बीपीएल कार्ड धारकांना साखरेचे माहे मे महिन्यासाठी
1433 क्विंटलचे नियतन मंजुर
        हिंगोली, दि. 24 :  जिल्ह्यासाठी बीपीएल कार्डधारकांना माहे मे - 2017 या महिन्याकरीता  तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 373, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 180, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली  ( स्थित ) - 285, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 360, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 235 असे एकूण 1433 क्विंटल साखरेचे नियतन मंजुर करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                                                ***** 
जागतिक हिवताप दिनानिमित्त एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 24 :  हिवतापाचा प्रसार ॲनाफिलीस डासाच्या मादीपासून होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भातशेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इत्यादी मध्ये होते. हिवताप प्रसारक ॲनाफिलीस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन डासांच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतु यकृतामध्ये जातात व तेथे त्याची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येतो.
हिवतापाचा प्रसार : थंडी वाजुन ताप येणे, ताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो, नंतर घाम येऊन अंग गार पडते, डोके दुखते, बऱ्याच वेळा उलट्या होतात. हिवतापाचे निदान : हिवतापाच्या निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाच्या रक्तनमुना घेऊन तो सुक्ष्मदर्शकाखाली तपासणे आवश्यक असते. हिवताप उपचार - सुधारित उपचार पध्दती : रक्तनमुना घेतल्यावर हिवताप लक्षणे युक्त रुग्णास उपचार संशयित हिवताप रुग्णाचा रक्तनमुना घेऊन त्यांना वयोगटानुसार क्लोरोक्वीन गोळ्यांची पुर्ण मात्रा द्यावी व सुक्ष्मदर्शकाव्दारे रक्तनमुने तपासणी अंती हिवतापाचे निश्चित निदान झाल्यावर संबंधित रुग्णास जंतुच्या प्रकारानुसार योग्य तो औषधोउपचार देण्यात यावा.
किटकजन्य रोगांना प्रतिबंध : हिवताप / डेंगु/ चिकनगुणीया हे सर्व रोग स्वच्छ पाण्यात डास अंडी घालुन त्यापासून डास अळी व नंतर डास तयार होतात याला प्रतिबंध करण्यासाठी घरातील सर्व पाणीसाठे आठवड्यातून एक दिवस धुवुन पुसुन कोरडे करणे (कोरडा दिवस पाळणे) आवश्यक आहे. घाण पाण्यात क्युलेक्स डासाची मादी अंडी घालते व त्यापासून हत्तीरोगाची लागण होते म्हणून आपल्या परिसरातील सर्व नाल्या वाहत्या होतील डबकी, खड्डे यांच्यात पाणी साचुन राहणार नाही यांची काळजी घेतली तर हिवताप/डेंगु/चिकुणगगुणीया/हत्तीरोग होण्यात प्रतिबंध होऊ शकतो, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. जि. के. चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

21 April, 2017

वृत्त क्र. 163                                                                                                                                        दिनांक : 21 एप्रिल, 2017    
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी अनुसूचित जाती / जमाती विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारिरीक व मानसिकदृष्टया अपंग, कुष्ठरोगी  वगैरेसाठी तसेच समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील व्यक्ती / संस्थांना  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. तरी जिल्हयातील इच्छुक पात्र उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दि. 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
व्यक्ती व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे असणार आहे. या योजनेनुसार समाज कल्याण आणि कलात्मक साहित्य क्षेत्रात कार्य तथा   कल्याणासाठी झटणारे नामवंत व्यक्ती / समाजसेवक असावेत, समाज कल्याण क्षेत्रात व्यक्तींचे काम कमीत कमी 15 वर्षे कार्य केलेले असावेत, स्वयंसेवी संस्था या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 संस्था नोंदणी 1860 अंतर्गत नोंदणीकृत असाव्यात, स्वयंसेवी संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रातील सेवा कार्य 05 वर्षाहून अधिक असावे. विशेष मौलिक मौलिक भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्यात येईल. पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्तीस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही, पुरस्कार मिळण्यास पात्रता व्यक्तीगत मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा याबाबतीत विचार करण्यात येणार नाही, व्यक्तींचे गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, मागील पाच वर्षोचे लेखापरिक्षण अहवाल आवश्यक, संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आवश्यक, संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यांविरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी,  सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, व्यक्ती / संस्थेनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल देणे आवश्यक आहे.
*****
वृत्त क्र. 164                                                                                           
साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी मांतग समाजाकरिता कला, साहित्य, शैक्षणिक क्षेत्रात कार्यकरणारे नामवंत, कलावंत, साहित्यिक व समाज सेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील व्यक्ती / संस्थांना साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार दिला जाणार आहे. तरी जिल्हयातील इच्छुक पात्र मातंग समाजातील उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दिनांक 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
व्यक्ती व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे असणार आहे. मांतग समाजाकरिता कला, साहित्य, शैक्षणिक क्षेत्रात कार्यकरणारे नामवंत, कलावंत, साहित्यिक व समाज सेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील व्यक्ती व संस्था, समाज कल्याण क्षेत्रात व्यक्ती व संस्थेचे कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावेत, वैयक्तीक पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्ती व संस्थेस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार  नाही, पुरस्कार मिळण्यास पात्रता व्यक्तीगत मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या  पदाचा याबाबतीत विचार करण्यात येणार नाही, व्यक्तींचे गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र,  सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, मांतग समाज सेवा व विकास या क्षेत्रात काम पाहुन पुरस्कारासाठी काम पाहुण पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल, स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 संस्था नोंदणी 1860 अंतर्गत विशेष मौलिक मौलिक भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्यात येईल, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, मागील पाच वर्षोचे लेखापरिक्षण अहवाल आवश्यक, संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आवश्यक, संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यां विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
*****
वृत्त क्र. 165                                                                                           
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन, शेतमजूर व दुर्बल घटकाचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील संस्था / व्यक्तींना पद्यश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार दिला जाणार आहे. तेंव्हा हिंगोली जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दि. 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
व्यक्ती व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे असणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन, शेतमजूर व दुर्बल घटकाचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 संस्था नोंदणी 1860 अंतर्गत विशेष मौलिक मौलिक भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्यात येईल, समाज कल्याण क्षेत्रात व अनु.जाती व नवबौध्द समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रध्दा रुढी निर्मूलन, जनजागृती, भूमीहिन शेतमजूर यांचे कल्याण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल, समाज कल्याण क्षेत्रात व्यक्तीस कमीत कमी 15 वर्षे कार्य केलेले असावेत, समाज कल्याण क्षेत्रात संस्थेस कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावे, विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल, हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र हया गोष्टींचा विचार केला जाणार नाही, लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत, वैयक्तीक पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्ती व संस्थेस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार  नाही, व्यक्तींचे गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा. संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यां विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी. 
*****
वृत्त क्र. 166                                                                                           
संत रविदास पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी चर्मकार समाजाचे कल्याणसाठी झटणारे नामवंत समाजसेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील व्यक्ती / संस्थांना संत रविदास पुरस्कार दिला जाणार आहे. तेंव्हा हिंगोली जिल्हयातील इच्छुक संस्थांना / व्यक्ती उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दि. 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
व्यक्ती व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे असणार आहे. चर्मकार समाजाचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 संस्था नोंदणी 1860 अंतर्गत विशेष मौलिक मौलिक भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्यात येईल, समाज कल्याण क्षेत्रात चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रध्दा रुढी निर्मूलन, जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल, समाज कल्याण क्षेत्रात व्यक्तीस कमीत कमी 15 वर्षे कार्य केलेले असावेत, समाज कल्याण क्षेत्रात संस्थेस कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावे, विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल, लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत, वैयक्तीक पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्ती व संस्थेस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार  नाही, व्यक्तीं  गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यां विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी.
*****
वृत्त क्र. 167                                                                                           
शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागामार्फत सन 2017-2018 साठी संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, रोजगार अशा व या सारख्या व्यक्तीगत व सामुहिक क्षेत्रामध्ये एकमेव अद्वितीय कार्य केलेल्या संस्थांना शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक पुरस्कार दिला जाणार आहे. तेंव्हा हिंगोली जिल्हयातील इच्छुक संस्थांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दिनांक 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे असणार आहे. स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 संस्था नोंदणी 1860 अंतर्गत विशेष मौलिक मौलिक भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्यात येईल, संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, रोजगार अशा व या सारख्या व्यक्तीगत व सामुहिक क्षेत्रामध्ये एकमेव अद्वितीय कार्य केलेल्या संस्थेस हा पुरस्कार दिला जाईल, समाज कल्याण क्षेत्रात संस्थेस कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावे, विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल. वैयक्तीक पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणतीही संस्था एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार  नाही, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यां विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी. 
*****


ऑटोरिक्षा / टॅक्सी भाडेदराचे अभिप्राय ऑनलाईन करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: ऑटोरिक्षा / टॅक्सी भाडे सुत्र ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने राज्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन ऑटोरिक्षा / टॅक्सी संघटनाचे मते व ग्राहक प्रतिनिधी यांची मते आजमवली आहेत. यादरम्यान विविध मुद्दावर संबंधितामध्ये दिलेल्या मतांमध्ये मत भिन्नता असल्याने समितीने व्यापक प्रमाणावर ऑटोरिक्षा / टॅक्सी व्यवसायिकांना त्यांच्या संघटनाना तसेच जनतेला त्यांची मते समितीकडे मांडता यावीत याकरीता समितीने संगणकीय सर्व्हे घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार अध्यक्ष यांनी निर्देश दिले आहेत की विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑटोरिक्षा / टॅक्सी सर्व्हे नमुने ऑनलाईन भरणा करण्यासाठी अपलोड करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी केले आहे.
ऑटोरिक्षा / टॅक्सी भाडेदर सुत्र समितीचे महाराष्ट्रातील जनतेचा अभिप्राय, ऑटोरिक्षा चालक अभिप्राय, टॅक्सी चालक अभिप्राय, ऑटोरिक्षा / टॅक्सी संघटनांचा अभिप्राय हे नमुने सर्व्हेक्षण करण्यास्तव वेबसाईटवर Maji Menu - सूचना - फिडबॅक फॉर्म यानुसार मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये ऑनलाईन भरणा करण्यासाठी अपलोड केले आहेत. तरी हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी, ग्राहक प्रतिनिधी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, चालक व संघटनांनी रविवार दि. 30 एप्रिल 2017 पर्यंत आपले अभिप्राय परिवहन विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदवावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली यांनी केले आहे.

*****