12 October, 2021

 

बाल शक्ती पुरस्कारासाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 12 : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो.

बाल शक्ती पुरस्कार : ज्या मुलांने शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केली आहे. अशा 5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो.

बाल कल्याण पुरस्कार : बाल कल्याण पुरस्कार हा वैयक्तीक व संस्था स्तरावर दिला जातो. वैयक्तीक स्तरावरचा पुरस्कार मुलांच्या विकास, संरक्षण कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो. तर संस्था स्तरावरचा पुरस्कार बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्ष सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी लागते.

केंद्र शासनाने बाल शक्ती पुरस्कार-2022 साठी दि. 15 ऑक्टोबर, 2021 पर्यंत अर्ज मागविले आहेत. हे अर्ज www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्काराची सविस्तर माहिती वरील संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. याचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*******

No comments: