26 April, 2023

 

विम्याची रक्कम अदा करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते अद्यावत करावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे पिकविम्याची रक्कम त्याच्या खात्यात वर्ग करण्यास अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आपले बँक खाते अद्यावत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, नोडल अधिकारी बंटेवाड, ॲग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक एस.डी.सावंत, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, सन 2022 च्या खरीपाचे पिकविम्याचे पैसे त्यांचे बँक खाते अद्यावत नसल्यामुळे 43 लाख रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करणे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या आठ दिवसात आपली बँक खाते अद्यावत करुन घ्यावीत, म्हणजे सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकता येईल. तसेच यावर्षी रब्बी हंगामाचा पीक विमा भरला आहे. तसेच हवामान आधारित फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी सध्या वादळ व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या फळ पिकांची इंटिमेशन विमा कंपनीकडे द्यावेत. तसेच पिक विम्यासंदर्भात प्राप्त झालेला तक्रारीचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.  

****

 

No comments: