14 July, 2016

अपंगानी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 14 :- अपंग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाने सन 2016 च्या पुरस्कारासाठीचे अर्ज दिनांक 20 ऑगस्ट, 2016 पर्यंत मागविलेले आहेत. याच अर्जामधून महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अपंग कल्याण राज्य पुरस्कारासाठीची निवड करताना विचार केला जाणार आहे. केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कार योजनेचा तपशील व त्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, हिंगोली येथे उपलब्ध आहे. तसेच सदर अर्ज केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
पात्र व इच्छूक अपंग व्यक्तींनी दिनांक 30 जुलै, 2016 पर्यंत प्रस्ताव कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: