08 May, 2017

सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या
 विविध पुरस्कारांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुदतवाढ
हिंगोली, दि. 8 :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व शाहु, फुले, आंबेडकर परितोषिक पुरस्काराकरिता प्रस्ताव मागविण्यासाठी दिनांक 18 एप्रिल, 2017 रोजीच्या पत्रान्वये हिंगोली जिल्हयातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली मार्फत प्रसिध्द करण्यात आली होती.
सदर जाहिरातीमध्ये प्रस्ताव दाखल करण्यासाठी अंतिम मुदत दिनांक 30 एप्रिल, 2017 पर्यंत देण्यात आली होती. आता सदरची प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली असून इच्छुक मान्यवर व संस्थांना त्यांचे अर्ज दिनांक 15 मे, 2017 अखेर सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली या कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: