09 May, 2017

वाहनांवरील लाल / अंबर दिवे काढण्याबाबत आरटीओचे आवाहन
हिंगोली दि. 9 :  जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी केंद्र शासनाच्या सुधारित अधिसूचनेनूसार ज्या वाहनांवर दिवा लावण्यास अनुज्ञेय नाही त्या वाहनांवरील लाल, अंबर दिवे व ॲम्ब्युलन्सवरील दिवे काढून टाकावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली यांनी केले आहे.
            केंद्र सरकारने 1 मे 2017 रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 108 मध्ये सुधारणा केली आहे. या तरतुदीनुसार वाहनांवरील लाल / अंबर दिवा तसेच ॲम्ब्युलन्सवरील जांभळ्या काचामधील लाल दिवा लावण्याची तरतूद वगळण्यात आली आहे. त्याच बरोबर उच्च पदस्थांच्या एस्कॉटींग करणाऱ्या वाहनांवर दिवे लावता येणार नाहीत. आपत्कालीन किंवा आणिबाणी व्यवस्थापनासाठी विशिष्ट प्रकारची रचना केलेल्या वाहनांवर केंद्र शासन विनिर्दिष्ट करेल त्यानुसार बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा रंगाचा दिवा लावण्यास परवानगी आहे. त्याशिवाय एअरपोर्ट, बंदरक्षेत्र, खनिक्षेत्र आणि प्रकल्पांच्या क्षेत्रात चालणाऱ्या वाहनांवर त्यांच्या कार्यक्षेत्रात अंबर दिवा लावता येईल. परंतू त्यांच्या क्षेत्राबाहेर अथवा सार्वजनिक रस्त्यावर वाहनावरील अंबर दिव्याचा वापर करता येणार नाही. तसेच जर वाहन विनिर्दिष्ट वापर करता येणार नाही. असेही अधिसूचनेत म्हटले आहे.

*****

No comments: