20 May, 2017

उत्तराखंड येथे गेलेल्या भाविक व पर्यटकांच्या नातेवाईकांनी
नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली दि. 20 : उत्तराखंड येथील दि.१९ मे, २०१७ रोजी सायंकाळी जोशीमठ जवळ भूस्खलन होऊन हजारो पर्यटक अडकले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातून उत्तराखंड येथे गेलेल्या पर्यटकांना मदत तसेच इतर सुविधा प्राप्त करून देण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उत्तराखंड येथे गेलेल्या नागरीकांची माहिती कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्र परिवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. ०२४५६-२२२५६० व  भ्रमणध्वनी ९५२७०४४१७१ या क्रमांकावर  देण्याचे आवाहन केले आहे.
            सदरील भूस्खलनाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षामार्फत ट्रॅव्हल्स कंपनी, यात्रा आयोजक, सोशल मिडिया तसेच स्थानिक नागरीक यांच्यामार्फत उत्तराखंड येथे गेलेल्या नागरीकांची माहिती घेण्यात आली होती. त्यानुसार माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्री. भंडारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी नियंत्रण कक्षामार्फत जिल्ह्यातून उत्तराखंड येथे गेलेल्या पर्यटकांशी, यात्रा आयोजक व ट्रॅव्हल्स कंपनी यांना संपर्क साधला. त्यानुसार पर्यटकांची विचारपूस करून कोणतीही अडचण नसल्याचे तसेच सुखरूप असल्याचेही पर्यटकांमार्फत कळविण्यात आले आहे. यात्रा आयोजक व ट्रॅव्हल्स कंपनी यांना पर्यटकांची काळजी घेण्याबाबत तसेच जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहण्यासाठी यावेळी सूचित करण्यात आले आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****

 

No comments: