25 May, 2017

स्वच्छ भारत मिशन यांचा स्वच्छतेवर जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
हिंगोली, दि.25 : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाअंतर्गत दि. 23 एप्रिल, 2017 रोजी ग्रामपंचायत कोथळज ता. हिंगोली येथे कलापथकाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शाहिर इंगोले यांनी कलापथकाव्दारे स्वच्छता व जनजागृतीपर वर आधारित मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, श्रीमती दिपाली कोतवाल, गट विकास अधिकारी श्री. बोंदरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. वैष्णवी दिलीप घुगे, सरपंच दिलीप घुगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कलापथक कार्यक्रम हा स्वच्छतेच्या जनजागृतीपर कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावातील ग्रामस्थांना स्वच्छतेबद्दल महत्व पटवून दिले. तसेच गावातील महिलांनी सहभाग घेऊन गाव हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन याव्दारे करण्यात आले. तसेच गावातील शुध्द पाणी, गावातील रस्त्यावरील घान पाणी याबाबत व शौचालय बांधा व वापर करा. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी गावातील महिलांना शौचालय नसणाऱ्या कुटूंबाना शौचालय बांधण्याकरिता आवाहन केले.
गावातील ग्रामस्थांना गाव हागणदारी मुक्तीकरिता गावातील महिला तसेच गावातील बचत गटातील महिला कुंटूंब प्रमुख, गावातील ज्येष्ठ नागरिक, शाळेतील मुले यांना कलापथकाव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास जिल्हा कक्षातील तज्ज्ञ माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ श्यामसुंदर मस्के, राधेश्याम गंगासागर व गट संसाधन केंद्रातील श्री. भराडे व ग्रामसेवक उपस्थित होते.

*****

No comments: