27 April, 2018

किसान कल्याण कार्यशाळेचे 2 मे रोजी आयोजन


किसान कल्याण कार्यशाळेचे 2 मे रोजी आयोजन

हिंगोली,दि.27:- शेती  हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे शेतीची उत्पदकता वाढवणे, उत्पन्न वाढविणे तसेच शेतकरी स्वयंनिर्भर होण्याच्या दृष्टीने अनेक केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना राज्यामध्ये राबविल्या जातात. तथापि, या योजनांची एकत्रितरित्या माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचत नसल्यामुळे अनेक शेतकरी सदर योजना पासून वंचित राहतात. त्यामुळे शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी दि.02 मे 2018 रोजी हिंगोली जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये किसान कल्याण कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेत कृषि विभाग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय, जलसंधारण विभाग, रेशीम विभाग तसेच सहकार व पणन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
तसेच कृषि व फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी पालन, कुकूट पालन, रेशीम शेती, बिजोत्पादन अशा अनेक विषयावर प्रगतशील शेतकरी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील तज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे.
यावेळी जिल्हयातील प्रगतशिल शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे लघुपट (Documentary) दाखविण्यात येणार आहेत. तसेच कृषि व कृषि पुरक व्यवसायामध्ये उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
तरी सर्व शेतकऱ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  व्ही.डी. लोखंडे  व प्रकल्प संचालक आत्मा एम.डी.जाधव यांनी केले आहे.
00000

No comments: