18 April, 2018

जिल्ह्यातील 211 ग्रामपंचायत सदस्य अनर्ह


जिल्ह्यातील 211 ग्रामपंचायत सदस्य अनर्ह

      हिंगोली,दि.18: ग्रामपंचायत  सार्वत्रिक निवडणुका 2017 मध्ये निवडणुका लढविणाऱ्या  उमेदवरांनी  खर्चाचा हिशोब विहित कालावधीमध्ये सादर न केल्यामुळे हिंगोली तालुक्यातील 67, कळमनुरी तालुक्यातील 52, सेनगाव तालुक्यातील 14, औंढा नागनाथ तालुक्यातील 38 तर वसमत तालुक्यातील 39 अशा एकूण 211 उमेदवारांना महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 19 नोव्हेंबर, 2010 अन्वये जिल्हाधिकारी, हिंगोली यांना  प्रदान केलेल्या अधिकारानुसार तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम14 ख (1) च्या तरतुदीनुसार 5 वर्षांकरिता उक्त सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य  होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

No comments: