07 April, 2018

समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताहचे आयोजन


समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताहचे आयोजन
        हिंगोली, दि.07 : भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंती  निमित्य दरवर्षी  दिनांक 08 एप्रिल  ते  14 एप्रिल  सामाजिक समता सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त दिनांक 08 एप्रिल 2018 ते 14 एप्रिल 2018 या कालावधीत सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
       दिनांक 08 एप्रिल 2018 रोजी  जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सर्व शासकीय अधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हिंगोली येथे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
            दिनांक 09 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10:00 वाजता जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळा, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक 10 एप्रिल, 2018 रोजी जिल्हास्तावर रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी  क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2018 रोजी सामाजिक न्याय व सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व त्या अंतर्गत कर्जाचे वाटप याबाबत लाभार्थ्याना सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. दिनांक 12 एप्रिल 2018 रोजी  सर्व शासकीय कार्यालयामध्ये व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्त्यामध्ये स्वयंसेवी संस्थाच्या साह्याने स्वच्छता अभियान राबवायचे  आहे. दिनांक 13 एप्रिल 2018 रोजी जिल्ह्यातील विचारवंत, नामवंत, पत्रकार, लोक कलावंत तसेच सामाजिक चळवळीतील प्रसिध्द व्यक्ती यांचे समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे व व्याख्यानाचे  आयोजन करण्यात येणार आहे.
            तसेच दिनांक 14 एप्रिल 2018 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी 08:50 वा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलाआहे.
        जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिकांनी या सामाजिक समता सप्ताहमध्ये सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

0000

No comments: