10 February, 2025

शिधापत्रिकाधारकांनी 28 फेब्रुवारी पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक

हिंगोली (जिमाका), दि. 10 : सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच त्याअनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या सर्व पक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी देशात शंभर टक्के ई-केवायसी होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रास्त भाव दुकान स्तरावर ई-केवायसी प्रमाणिकरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी आपण व आपल्या कुटुंबियासोबत आपल्या शिधापत्रिकेत असलेल्या सर्व व्यक्तींचे आधारक कार्ड घेऊन त्याचे सत्यापन (व्हेरीफिकेशन) करुन घेणे सक्तीचे व बंधनकारक आहे. सत्यापन (व्हेरीफिकेशन) न केल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींचे नाव वगळल्यास किंवा त्यांचे शिधा जिन्नस बंद झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शिधापत्रिका धारकाची राहील. सत्यापन (व्हेरीफिकेशन) बंधनकारक असून आधार कार्ड व शिधापत्रिका ही आवश्यक कागदपत्रे घेऊन दि. 28 फेब्रुवारी, 2025 पर्यंत ई-केवायसी करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. ********

No comments: