21 February, 2025
जय शिवाजी जय भारत पदयात्रा व कौशल्य दिंडीस प्रतिसाद
हिंगोली (जिमाका), दि.21 : भारत सरकारचे केंद्रीय युवक व कल्याण विभागाचे राज्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त "जय शिवाजी जय भारत" पदयात्रा तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या विभागामार्फत कौशल्य दिंडी काढण्यात आली.
"जय शिवाजी जय भारत "पदयात्रा व कौशल्य दिंडीचे जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पोस्ट ऑफीस, महात्मा गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा गांधी चौक, परत छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने कौशल्य दिंडी काढण्यात आली.
या पदयात्रा व कौशल्य दिंडीप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र), उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामीण विकास), जिल्हा क्रिडा अधिकारी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त, , जिल्हा उत्सव समितीचे आयक्ष, शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सहायक माहिती अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा युवा अधिकारी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
"जय शिवाजी जय भारत" पदयात्रा व कौशल्य दिंडीव्दारे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागात राबविण्यात येणाऱ्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजना, आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, रोजगार मेळावा, मॉडेल करिअर सेंटर, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ इत्यादी योजनेची कौशल्य दिंडी व स्टॉल लावून योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात आला.
"जय शिवाजी जय भारत" पदयात्रा व कौशल्य दिंडीमध्ये कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातील एकूण 503 युवा कार्य प्रशिक्षणार्थी व कौशल्य विकास प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला. तसेच कार्यालयातील नवनाथ टोनपे, मनोज लोखंडे, राजेभाऊ कदम, रमेश जाधव, नागेश निरदुडे, पवन पांडे व अमोल आडे आदी अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment