11 April, 2025
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 13 एप्रिल रोजी जयभीम पदयात्रेचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 11 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीमित्त दि. 13 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, एन.एस.एस., एन.सी.सी., नेहरु युवा केंद्र व इतर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दि. 13 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 7.30 वा. जयभीम पदयात्रेचे आयोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्यानुषंगाने हिंगोली येथे दि. 13 एप्रिल, 2025 रोजी सकाळी ठिक 7.30 वा. जयभीम पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पदयात्रेचा मार्ग शासकीय विश्रामगृह-पोस्ट ऑफीस-गांधी पुतळा-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप असा आहे.
या पदयात्रेचे उदघाटन जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून होणार आहे. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थीत राहणार आहेत.
या पदयात्रेस जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रीडाप्रेमी, खेळाडू, नागरीक, युवक-युवती यांनी उपस्थित रहावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment