19 October, 2022

 

तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राद्वारे विविध गावांमध्ये स्वच्छता अभियान

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : संत नामदेव सेवाभावी संस्था, संचलित भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली संलग्न कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर ता. कळमनुरी जि. हिंगोली अंतर्गत 'स्वच्छता अभियान 2.0' तसेच प्रलंबित कार्य पूर्ण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.  या मोहिमेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व सेनगाव तालुक्यातील वांजोळा, तोंडापूर, कोंढुर, सिंदगी, कुर्तडी , भवानी मंदिर, येडशी, भोसी, भुवनेश्वर, जिल्हा परिषद हायस्कुल कुर्तडी व कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरामध्ये विविध उपक्रमाद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध गावांमध्ये स्वच्छता व स्वच्छता शपथ गावकऱ्यांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोहि  पूर्ण करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे  गाव आणि शहरे स्वच्छ राहतील आणि रोगांचा प्रसार होणार नाही. त्याचबरोबर माणसाची जीवनशैली सुद्धा बदलून जाईल.

या कार्यक्रमाची सुरुवात माजी खासदार शिवाजीराव माने यांनी  2 ऑक्टोबरला कृषी विज्ञान केंद्रात भेट देवून केली असून हा उपक्रम कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

या उपक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. राजेश भालेराव, प्रा. अनिल ओळंबे, प्रा. अजयकुमार सुगावे, प्रा. रोहींनी शिंदे, डॉ. अतुल मुराई, डॉ. कैलाश गीते यांनी  विविध गावामध्ये जाऊन स्वच्छता मोहिमेचे कार्य करुन प्रसार व प्रचार करीत आहेत.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विजय ठाकरे, सौ. मुंगल, शिवलिंग लिंगे, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, प्रेमदास जाधव, संतोष हानवते हे उत्तमरित्या मदत करत आहेत.

*****

No comments: