17 October, 2022

 

चला जाणूया नदीला या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात  कयाधू नदी जनसंवाद यात्रेचे

उद्या दि. 18 ऑक्टोबर रोजी उद्घाटन 

 


हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्यातील 75 नद्यांच्या खोऱ्यामध्ये नद्यांचे पुनर्जीवन करण्याच्या उद्देशाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने चला जाणूया नदीला हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कयाधू नदी जलसंवाद यात्रेचे उद्घाटन उद्या दि. 18 ऑक्टोबर, 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणार आहे.  या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन आज आयोजित केलेल्या चला जाणूया नदीला या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, राज्य समितीचे सदस्य जयाजी पाईकराव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेची सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी होणाऱ्या कयाधू नदी जलसंवाद यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी संजय दैने व निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे .  

*****

No comments: