24 November, 2022

 

पूर आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी नद्यांचे पुनर्जीवन महत्वाचे

-- उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ

 

  • चला जाणूया नदीला या उपक्रमाच्या पूर्वतयारी बैठकीसाठी वसमत तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

 





हिंगोली (जिमाका), दि. 24 : भारतीय माणसाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. पूर्वी निसर्ग, पाऊस , पाणी आणि माणसं यांचं निसर्गचक्र अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असायचं . पण आता माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. त्यामुळे कधी पाऊस कमी तर कधी जास्तीचा होतो त्यामुळे पूर्वी नद्या जशा वाहायच्या त्या वाहने आता थांबल्या आहेत. काही नद्या तर नामशेष झाल्या आहेत. त्यामूळे झाडं जंगल संपत चालले आहे, त्यामुळे पुन्हा माणसांनी एकत्र येऊन नद्यांची झालेली हानी थांबवली पाहिजे. त्यासाठी शासनाने चला जाणू या नदीला हा उपक्रम सुरु केला आहे. आपल्या वसमत तालुक्यात आसना नदीच्या उगमापासून तर ती नदी जिथपर्यंत वाहते तिथपर्यंत लोकांनी लोक चळवळ उभारले तर या नद्या पुन्हा नैसर्गिक थांबेल आणि शेती पर्यायाने देशाचा शेतकरी सुखी आयुष्य जगेल. त्यामुळे पूर आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी नद्यांचे पुनर्जीवन करणे महत्वाचे आहे, असे मत वसमत येथील 'चला नदीला जाणूया,  या अभियानाअंतर्गत वसमत तालुक्यातील उपस्थित नागरिक आणि विविध विभागांचे अधिकारी यांच्या बैठकीत व्यक्त केले.

राज्यातील नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी शासनाच्या वतीने चला जाणूया नदीला या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने वसमत तालुक्यात आसना नदीच्या पुनर्जीवनासाठी रथयात्रा येणार आहे. राज्यातील 75 नद्यावर एकाच दिवशी नदी यात्रेला सुरुवात झालेली आहे. या यात्रेत नदी अभ्यासक, नदीप्रेमी, शेतकरी, विद्यार्थी, सरकारी अधिकारी सहभागी होणार आहेत. नदीला अमृतवाहिनी बनवण्यासाठी नागरिकांना नदी साक्षर करण्याबाबतचा मसुदा तयार करणे, नद्यांचे स्वच्छ आणि मानवी आरोग्य यांची रुपरेषा आखणे, नदीचा तट आणि प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार करणे, अनलॉक क्षेत्राचा अभ्यास करुन कार्यवाही अहवाल सादर करणे हा उद्देश आहे. त्यानिमित्त पूर्वतयारीची बैठक वसमत तहसील येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी  या प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक उगम विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव,, नायब तहसीलदार निलेश पळसकर , पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले, तालुका वनविभाग अधिकारी बी. जी. पवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव खराडे गुरुजी, विस्तार अधिकारी कोकरे, वनरक्षक अनुराधा जायभाये वनपाल ए. टी. पारस्कर , केंद्रप्रमुख नलगे , शिक्षण विभागाचे पदाधिकारी, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, विविध खाजगी शाळेचे मुख्याध्यापक, वनविभागाचे विविध अधिकारी , निसर्ग प्रेमी नागरिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक उगम विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी वसमत तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारी आसना नदी तिचा इतिहास उगम आणि पुनर्जीवन या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले, वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले यांनी सुद्धा आपले विचार या प्रसंगी मांडले.

*****

No comments: