30 December, 2022

 

जिल्ह्यात लम्पी आजाराने आतापर्यंत 145 जनावरांचा मृत्यू

लम्पी आजाराने मृत झालेल्या 77 जनावरांच्या पालकांना दिला अर्थसहाय्य

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव होत असून लम्पी आजाराने बाधित जनावरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जिल्ह्यांत लम्पी आजारामुळे आतापर्यंत 33 गाई, 37 बैल व 93 वासरे असे एकूण 163 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 32 गाई, 37 बैल व 86 वासरे असे एकूण 155 मृत झालेल्या जनावरांच्या पालकांचे अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

प्राप्त 155 प्रस्तावापैकी 29 गाई, 36 बैल व 80 वासरे असे एकूण 145 मृत जनावरांचे प्रस्ताव समितीने मंजूर केले आहेत. या मंजूर 145 प्रस्तावापैकी 17 गाई, 16 बैल व 44 वासरे अशा एकूण 77 मृत जनावरांच्या पालकांना अर्थसहाय्य अदा करण्यात आले आहे.

उर्वरित 23 जनावरांचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी बीडीएसवर 5 लाख रुपयाची रक्कम प्रापत झाली असून याचे देयक कोषागारात सादर करण्यात आले आहे. हे देयक मंजूर झाल्यानंतर 23 जनावरांचे अनुदान त्वरित अदा करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त उर्वरित 63 जनावरांचे अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असून बीडीएसवर रक्कम प्राप्त होताच बैठक घेऊन त्वरित पशुपालकांना रककम अदा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, हिंगोली यांनी दिली आहे.

 

*****

No comments: