26 June, 2023

 

‘नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 ते 2027 अंतर्गत’

 जिल्हा नियामक समितीची बैठक संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 ते 2027 या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा नियामक समितीची बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथ.), शिक्षणाधिकारी (योजना), शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, नगरपरिषद हिंगोली, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प., जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह इतर विभागांचे समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 15 वर्षावरील सर्व निरक्षरांना पायाभूत साक्षरता (वाचन,लेखन) व संख्याज्ञान विकसीत करण्यात येणार असून या कार्यक्रमात अंमलबजावणीसाठी शाळा हे एकक असणार असल्याचे सांगतांना लाभार्थी आणि स्वयंसेवी शिक्षक यांचे सर्वेक्षण शाळांकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना दिल्या.

याबैठकीत शिक्षणाधिकारी (योजना) माधव सलगर यांनी आपल्या प्रस्तावनेत नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-2027 या बाबतची पार्श्वभूमी, कार्यक्रमात सहभाग व उद्देश याविषयी सविस्तर माहिती सांगितली. यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) या कार्यालयातील सहाय्यक योजना अधिकारी बी.आर.ठाकूर, एस.एल.येल्लारे, कनिष्ठ लिपीक एम.डी. इंगोले यांनी बैठक यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले.

*****

 

 

 

 

No comments: