08 May, 2023

 

राष्ट्रीय डेंग्यू  दिन साजरा करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 :  राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दि. 16 मे, 2016 रोजी राज्यात साजरा केला जातो. यानिमित्त डेंग्यू विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. डेंग्यू दिवस जिल्हा अंतर्गत सर्वत्र साजरा करण्यात येतो. राज्यात तापाच्या साथीमध्ये प्रामुख्याने डेंगीच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते.

सध्या उन्हाळा सुरु आहे. राज्यात हवामानात बदल तसेच जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने लोकाची पाणी साठवण्याची प्रवृत्ती आढळून येणे नाकारता येत नाही.  त्या अनुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पती होते. या डासाची उत्पती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. आजाराचे नियंत्रण करण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक आहे. केंद्र शासनाने डेंग्यू या विषयावर India Fights Dengu हे मोबाईल ॲप्लीकेशन तयार केलेले आहे. त्याच प्रमाणे ॲन्ड्राईड मोबाईलवर प्ले स्टोअर मध्ये जाऊन India Fights Dengu हे ॲप शोधावे व मोबाईलवर ते डाऊनलोड करुन घ्यावे. यामध्ये डेंग्यू विषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड यांनी आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील सर्व आरोगय संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठि नागरिक यांचा लोकसहभाग घेऊन गावपातळीवरही राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार आहे.  यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, तालुकास्तर सभा, सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन, ग्रामसभेचे आयोजन, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन, हस्त पत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन, डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, सर्व स्तरावरील फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण, एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

डेंग्यू,  चिकुनगुनिया बाबतची लक्षणे : एडीस एजिप्टाय डासाच्या संक्रमणात्मक चांव्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर डेग्यूंची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक हा ताप अधिक तीव्र स्वरुपाचा असून त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो. लहान मुलांमध्ये शक्यतो सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसामध्ये अधिक तीव्रपणे तापासोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो.

 उपचार : सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होतो.

तापमान सुरक् अधिक वाचाजत त्यामुळे मृत्यु भी तो लहान मुलगा शक्यतो सौम्य स्वरुपाचा ताप येतो मातामध्ये अधिक तिव्रपणे ताप सोबत दोन डोळे दुखणे, अंगदुखी, अंगावर लाल रंगाचा पटटा येऊ उपचार

उपाय योजना : डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्यानुषंगाने कोणतेही साठवलेले पाणी 8 दिवसापेक्षा जास्त ठेवू नये, ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

डासोत्पती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तीगत सुरक्षेअंतर्गत मच्छरदाण्यांचा वापर, डासांच्या चाव्यापासून रक्षणासाठी विविध उपाय करण्यासाठी कोरडा दिवस पाळून किटकजन्य आजार डेंग्यू, चिकुनगुनिया आजारावर नियंत्रण ठेवण्यास जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.गणेश जोगदंड, जिल्हा हिवताप अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: