01 May, 2023

 

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वरुड येथील

बाधित शेती पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी साधला संवाद

 




            हिंगोली (जिमाका), दि. 01 :  जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीपिंकाचे नुकसान झाले आहे. आज राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी  कळमनुरी तालुक्यातील मौजे  वरुड शिवारातील पंडितराव धोंडीबा येगाडे  यांच्या शेतातील गारपीट व अवकाळी  पावसामुळे नुकसान झालेल्या केळी, पपई या पिकांची पाहणी केली. तसेच त्यांनी यावेळी  पंडितराव येगाडे व उपस्थित शेतकरी, अधिकारी यांच्याशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. तसेच या संकटाच्या काळात राज्‍य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून तातडीने शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन मदत देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले .

यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, तहसीदार सुरेखा नांदे, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषि सहायक, शेतकरी आदी उपस्थित होते.

****

No comments: