येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य
मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या
दुसऱ्या सत्रात श्रीमती सिंधुताई दहिफळे यांच्या
अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी प्रमुख कवी डॉ. विष्णु सुरासे हे प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कवी संमेलनात श्रीमती सिंधुताई दहिफळे यांनी उठ युवका
जागा हो आणि माय मराठी, सुनिल हुसे यांनी ग्रंथालयावर कविता, प्रा.विलास खरात यांनी
शेतकरी आत्महत्येवर आधारित आधीच होता डोईवर कर्जाचा डोंगर, ॲड. स्वप्नील मुळे यांनी
खेळणाऱ्या नातवाला आम्हाला पाहायच वृद्धाश्रमात नको आम्हाला घरातच राहायचे ही कविता,
श्रीमती कांताबाई कल्याणकर यांनी होळी निमित्त होळी ग होळी तू येतीस दरवर्षी , श्रीमती
अर्चनाताई मेटे यांनी सामर्थ्य लेखनीचे, दिगंबर जाधव यांनी पेराल ते उगवेल, श्रीमती
सुप्रियाताई दापके यांनी तू बंड बुडाचे झाड, राजकुमार नायक यांनी बाप जगाचा पोशिंदा
आणि कापूस गेलाय बाराच्या भावात ऊसाला नाही भाव मला शेती विकायची राव, शिवाजीराव लाखकर
यांनी बंगाली कविता व वानर ग वानर हुप हुप करीत आली, श्रीमती दुर्गा मस्के यांनी मायत्व
जाण्याने, श्रीमती ज्ञानदा चौधरी यांनी लक्ष्मण रेषा, विलास आदमाने यांनी स्वभाच्या
प्रेमात पडणारा, राजकुमार मोरगे यांनी वाटणी, निखील नाईक यांनी वाटे हृदयात आता सोडून
तुला जाताना ही प्रेम कविता, आयुष गुप्ता यांनी ऐसा क्या है माता तेरे भाव मे, महासेन
प्रधान यांनी मशाल व त्यांच नाव भिमराव, सुधाकर मोरे यांनी दाही दिशा घुमते रे वाणी
गुरुवीन नाही ग्यानी, समाधान लोणकर यांनी भिडेवाडा, विजय गुंडेकर यांनी शिवबा यांच्यासह
श्रीमती सविता देशमुख, अंकीत हरकळ, भारती तुकाराम, शिल्पा दोडेकर आदी विविध कवींनी
या कवि संमेलनात शेतकरी समस्या, सामाजिक जाणीवा, कुटुंबव्यवस्था,
मातृभाषा, प्रेमभावना आदी विषयांवर कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
यावेळी हास्य कवी डॉ. विष्णु सुरासे
यांनी बायकांनो ऑफिसात आता थम आले नवरे वेळेवर ऑफिसात जातील तुम्ही घरावरही एखादे थम
बसवा तेंव्हा हे घरी वेळेवर येतील आणि मालिकेतील प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले
तिचे सासू सासर भाकरीसाठी केंव्हाचे वाट पाहू लागले व मोबाईलची रिंगटोन आता मौतित सुद्धा वाजत आहे नको ते गाणं ऐकून
आज प्रेत सुद्धा लाजत आहे यासह इतर गंभीर स्वरुपाच्या रचना सादर करुन उपस्थितांना मार्गदर्शन
केले. तर या कवि संमेलनाचा अध्यक्षीय समारोप श्रीमती सिंधुताई दहिफळे यांनी कुणबी कांडतो
मरण ही कविता सादर करुन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार नायक, राजकुमार मोरगे
यांनी केले. तर शेवटी आभार गजानन शिंदे यांनी मानले.
या कवी संमेलनास जिल्ह्यातील सार्वजनिक
वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
******
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment