17 August, 2023

 

बालशक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो.

बालशक्ती पुरस्कार : ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, समाजकार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

बाल कल्याण पुरस्कार : बाल कल्याण पुरस्कार हा वैयक्तीक व संस्था स्तरावर दिला जातो. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            1) वैयक्तीक पुरस्कार : मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीसह हा पुरस्कार दिला जातो.

            2) संस्थास्तरावर पुरस्कार : बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्ष सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

केंद्र शासनाने सन 2024 साठी बाल शक्ती पुरस्काराचे अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज हे www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्काराची माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. यासाठी दि. 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: